
Stamp Duty : मोठी बातमी प्रतिज्ञापत्रासाठी लागणारी ५०० रुपयांची स्टॅम ड्युटी माफ
राज्यातील शासकीय कार्यालयात दाखल कराव्या लागणाऱ्या प्रतिज्ञापत्रकासाठी जोडावं लागणार ५०० रुपयांचं मुद्रांक शुल्क (Stamp Duty) आता माफ करण्यात आलं आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी हा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश त्यांनी दिलेत.
कोणत्या प्रतिज्ञापत्रांसाठी निर्णय लागू होणार
राज्यात कोणतंही शासकीय काम असो किंवा सरकारी परीक्षेचा अर्ज, नागरिकांना त्या कामासाठी जात पडताळणी, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र अशी प्रतिज्ञापत्रके जोडावी लागतात. या प्रतिज्ञापत्रकांसोबत एक ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्कही भरावे लागते. विशेषत: दहावी बारावीच्या निकालानंतर अनेक विद्यार्थी आणि पालकांना ही सर्व प्रमाणपत्र लागतात. या प्रतिज्ञापत्रकांसाठी लागणारा तीन ते चार हजार रुपयांचा खर्च आता वाचणार आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र,उत्पन्नाचा दाखला,रहिवासी प्रमाणपत्र,नॉन क्रीमीलेयर सर्टिफिकेट,राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रासह इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी हा निर्णय लागू करण्यात आला.